पर्यावरण विवेक समितीचा उपक्रम वृक्षारोपण व सवंर्धन कार्यक्रम. भालीवली दि. 1 जुलै (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या वृक्षलागवडीच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून विवेक रूरल डेव्हलपमेंट सेंटर संचालित पर्यावरण विवेक समिती ची स्थापना करण्यात आली. समिती ची मुख्य उद्दिष्ट्ये भारतीय जातीच्या झाडांचे वृक्षारोपण करून त्यांचे सवंर्धन करणे आहे. वृक्षारोपणा करीता शासनाची रीतसर मान्यता घेऊन शासकीय जागेवर समिती द्वारे वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन केले जाते. पर्यावरण विषयी जन जागृती होऊन जास्तीत जास्त लोकांचा सहभाग करून घेण्याच्या उद्देशानें पर्यावरण विवेक समिती द्वारे वृक्ष संवर्धन दत्तक योजना राबवली जाते. वृक्षदत्तक घेणाऱ्या पालकाच्या नावाचा बोर्ड वृक्षावर लवण्यात येतो व वेबसाईट वर ही नावे दर्शवण्यात येतात त्याच बरोबर वृक्ष दत्तक घेणाऱ्या पालकाला त्या वृक्षा चा फोटो सोशल मेढीया द्वारे पाठवण्यात येतो. पर्यावरण विवेक समिती मध्ये वनविभाग खात्यातील निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यांच्या अनुभवाचा फायदा वृक्षांच्या वाढीसाठी होतो. वृक्षांच्या देखभाली करीता माणूस (वनवासी बांधव) दरमहा पगारावर ठेवण्यात आले आहेत व त्यांचे कॉन्ट्रॅक्ट वनविभाग खात्यातील निवृत्त वनपालांना देण्यात आले आहे. देखभालीच्या कामाचा आढावा समितीतील अधिकारी वर्गा कडून दर १५ दिवसाने घेतला जातो व फोटो सकट त्याची नोंद ठेवली जाते. पर्यावरण विवेक समिती चे कामकाज अनुभवी / मार्गदर्शक ( निवृत्त अधिकाऱ्यांच्या ) मार्गदर्शना खाली सांभाळले जाते. झाडांना वेळोवेळी वृतु प्रमाणे निरनिराळी ट्रीटमेंट केली जाते. पर्यावरण विवेक समिती द्वारे १जुलै २०१६ रोजी १००० भारतीय झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले होते यातील ५०० वृक्ष हे शासकीय जागेवर भालीवली प्रकल्पा लगत राष्ट्रीय महामार्ग ८ च्या शेजारी करण्यात आली व ५०० फळ वृक्ष राष्ट्रसेवा समिती मधील विध्यार्थी वर्गाला घरी लावण्यासाठी देण्यात आली. समिती द्वारे दर ३ महिन्या ला विध्यार्थीच्या घरी जाऊन ऑडिट केले गेले आणि वर्ष अखेरीस १ जुलै २०१७ रोजी म्हणजेच दुसऱ्या वृक्षारोपणा दिवशी उत्तम वाढीसाठी बक्षिसे देऊन त्याना गौरविण्यात आले. पर्यावरण विवेक समिती द्वारे १जुलै २०१७ रोजी ८०० भारतीय झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे यातील ५०० वृक्ष हे शासकीय जागेवर भालीवली राष्ट्रीय महामार्ग ८ च्या शेजारी च करण्यात आली व १०० फळ वृक्ष राष्ट्रसेवा समिती मधील विध्यार्थी वर्गाला घरी लावण्यासाठी देण्यात आली. व राष्ट्रसेवा समिती द्वारे प्रशिक्षित केलेल्या हॅन्डीक्राफ्ट क्षेत्रात कामकारणाऱ्या महिलांना (वनवासी भगिनींना) घरी लावण्या साठी २०० मानवेल जातीचे बांबू वृक्ष देण्यात आली आहेत. या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा रोजगार हा मानवेल जातीच्या बांबूवृक्षांवर च अवलंबून आहे. पर्यावरण विवेक समिती जनजागृती करण्यासाठी निरनिराळे उपक्रम राबवत असते व हे वाचणाऱ्या तमाम वृक्षप्रेमींना समिती मध्ये सहभाग घेण्यासाठी आमंत्रण देत आहेत. पर्यावरण विवेक समिती द्वारे या पूर्ण दोन्ही वर्षातील वृक्षांची ३ वर्षा साठी जाबाबदारी घेण्यात आली आहे व त्या साठी समिती वृक्ष संवर्धन दत्तक योजना राबवत आहे. अधिक माहिती साठी संपर्क साधावा पर्यावरण विवेक समिती चे कार्यवाह श्री. उमेश गुप्ता. ९४२२ ४९२ ७४३ / ९३२२ ६९२ ७४३